नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उद्देशून स्पष्ट इशारा दिला की, “मतदान आमच्या बाजूने नाही केले तर तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत”. त्याचबरोबर भाजपचेआमदार चंद्रकांत पाटील यांनीही “तिजोरीचा मालक आम्हीच आहोत आणि चाव्या तुमच्याकडे वॉचमन म्हणून दिल्या आहेत” असे वक्तव्य केले. या दोन्ही विधानांनी लोकशाहीचा आत्मा दुखावला असून, नागरिकांना नोकर समजून सत्ता चालवण्याची मानसिकता स्पष्ट करते.सत्ताधाऱ्यांचा तिजोरीवर मालकी हक्काचा दावा लोकशाही की लूटशाही?तिजोरीच्या मालकीचा खरा हक्क हा जनतेचा आहे. जनता ही तिजोरीची मालक असून निवडून आलेले प्रतिनिधी हे फक्त तिचे 5 वर्षा साठी नोकरदार आहेत. परंतु आज हेच नोकर मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेच्या अहंकारातून हुकूमशाहीकडे वाटचाल होताना शासनकर्ते सर्वसामान्यांनाच धमकावताना दिसतात.संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांची पायमल्लीउद्या संविधान दिन आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे मतदानाचा अधिकार दिला आहे, जो कोणत्याही दबाव, धमकी किंवा स्वार्थासाठी वापरला जाऊ नये. पण आज आपण बघतो, की मताच्या जोरावर सत्तेत बसल्यानंतर, हजारो कोटींच्या निधीचा गैरवापर करून, स्वतःची तिजोरी भरण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहेत. हा सरळसरळ लोकशाहीवरील प्रहार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांची प्रतिक्रिया
हुकूमशाहीच्या इशाऱ्यांना जनता उत्तर देणार मतदानाने आप प्रशांत कांबळे यांची तीव्र प्रतिक्रिया नुकत्याच झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा