१४ सप्टेंबर २०२३

पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ 

Rni rajistration no Mah/mar ३७९१६

मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे 
संपर्क /9881751643,9822982750
(बी.ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)
पदवीधरांचे समस्या प्रभावीपणे सोडविणार - धनराज विसपुते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्ष पदवीधर प्रकोस्ठ नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.प्रदेश संयोजक धनराज विसपुते सांगली जिल्हा दोर्यावर आले असता भाजपच्या सांगली जिल्हा कार्यालयात संदीप चव्हाण (बाबा)यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठ सांगली जिल्हा ग्रामीण संयोजक तसेच अनिकेत औताडे यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ट सांगली जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली.पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक पदवीधर प्रकोश्ठ म्हणून सौ. कव्याश्री नलवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

          भाजपा सांगली जिल्हा सह संयोजक शैलेष फोंडे,अजय जगताप,डॉक्टर प्रशांत देशमुख यांची भाजपा पदवीधर प्रकोष्ठ सांगली जिल्हा समन्वयक या पदावर निवड करण्यात आली.यावेळी पदवीधर प्रकोष्ठ चे महाराष्ट्र प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांनी पदवीधर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.पदवीधरांचे सर्व समस्या सोडवण्याचा प्रभावीपणे प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.पदवीधर सदस्य ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करणे,पदवीधर मतदार नोंदणी करणे,जॉब फेअर चे आयोजन करणे,मतदार यादी सुसुत्रीकरण करणे,सिनेट निवडणूक तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा,विधानसभा - विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख उपस्थित भगवानराव साळुंखे (आप्पा)यांनी पदवीधर कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुंदर पाटील  यांनी तर स्वागत व सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले. आभार डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी मानले.सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संयोजक मुकुंद येवले, माजी संघटन सरचिटणीस अर्जुन बाबर,अनिल वाळवेकर,सचिन पवार,सुखदेव ऐवळे,प्रवीण तिकोटी,नामदेव सावंत,अनिल माने, बाबासो पाटील,रवींद्र पाटील उपस्थित होते.

०६ ऑगस्ट २०२३

डोळे येण्याची साथ (आय फ्ल्यू )

साप्ताहिक शिवकाळ(mah/mar३७९१६

मुख्य संपादक सुभाष गाडे

(बी.ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)

9881751643

महाराष्ट्रामध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे.डोळे येण्याचा संसर्ग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत आहे.त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे बनले आहे.डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.

        कसा होतो संसर्ग
           डोळे येण्याचा संसर्ग प्रथम एकाच डोळ्याला होतो.एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतो.एका व्यक्तीचे डोळे येवून गेले की,पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही असा लोकांचा गैरसमज असतो त्यामुळे निष्काळजी पण केला जातो पण तसे नसते.एकदा संसर्ग होवून गेल्या नंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होवून डोळे येवू शकतात.
        काय काळजी घ्यावी
         1)डोळे सतत स्वच्छ पाण्याने     धुवावेत.
२)प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.
३) कुटुंबातील सदस्या पासून दूर राहावे.
४)तेलकट खाणे टाळावे.
५)तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
६)डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये.
७)डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे,टॉवेल इतरांनी वापरू नयेत.
           असा ओळखा संसर्ग
      १)डोळे लाल होणे.
       २)पापण्या एकमेकांना चिकटने.
        ३)डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे
४)डोळ्यातून सतत पाणी येणे.
५)डोळ्यांना सूज येवून डोळे लाल होणे.
६)डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे.
७)डोळ्यांना खाज येणे.
८)डोळे जड वाटणे.
९) तीव्र प्रकाश सहन न होणे.

       अश्याप्रकरे आपण आपल्या डोळ्यांची  काळजी घेवू शकतात.



पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ  Rni rajistration no Mah/mar ३७९१६ मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे  संपर्क /9881751643,9822982750 (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता ...