साप्ताहिक शिवकाळ(mah/mar३७९१६
मुख्य संपादक सुभाष गाडे
(बी.ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)
9881751643
महाराष्ट्रामध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे.डोळे येण्याचा संसर्ग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत आहे.त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे बनले आहे.डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.
कसा होतो संसर्ग
डोळे येण्याचा संसर्ग प्रथम एकाच डोळ्याला होतो.एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्याला संसर्ग होतो.एका व्यक्तीचे डोळे येवून गेले की,पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही असा लोकांचा गैरसमज असतो त्यामुळे निष्काळजी पण केला जातो पण तसे नसते.एकदा संसर्ग होवून गेल्या नंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होवून डोळे येवू शकतात.
काय काळजी घ्यावी
1)डोळे सतत स्वच्छ पाण्याने धुवावेत.
२)प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.
३) कुटुंबातील सदस्या पासून दूर राहावे.
४)तेलकट खाणे टाळावे.
५)तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
६)डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये.
७)डोळे आलेल्या व्यक्तीचे कपडे,टॉवेल इतरांनी वापरू नयेत.
असा ओळखा संसर्ग
१)डोळे लाल होणे.
२)पापण्या एकमेकांना चिकटने.
३)डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखे वाटणे
४)डोळ्यातून सतत पाणी येणे.
५)डोळ्यांना सूज येवून डोळे लाल होणे.
६)डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे.
७)डोळ्यांना खाज येणे.
८)डोळे जड वाटणे.
९) तीव्र प्रकाश सहन न होणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा