पुणे :तलाठी हा जमीन महसूल व्यवस्थेतील एक महत्वाचा कमचारी आहे.गावपातळीवर शासन व जनता यातील एक महत्वपूर्ण दुवा म्हणून तलाठी काम करतो.तलाठ्यांना आजही ग्रामीण भागात सन्मानपूर्वक भाऊसाहेब असेच बोलले जाते.गाव काम गार तलाठी निवड ही जिल्हाधिकाऱ्यां च्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत लेखी परीक्षा घेवून केली जाते.गावपातळीवरील जमिनींचे अभिलेख सत्तत अद्यावत ठेवणे शासनाच्या नियमा नुसार ,नागरिकांना विविध दाखले - उतारे देणे,शिधा पत्रिका धारकांची सूची तयार करणे,शासनाच्या गौण खनिज संपत्तीचे रक्षण करणे इत्यादी कामे करावी लागतात.तलाठ्यांच्या कार्यक्षेत्र असते त्याला सज्जा असे म्हणतात.
पण असे असूनही हे तलाठी भाऊसाहेब अनेकदा कार्यालयात सापडत नाहीत.मीटिंग असल्याची करणे देत बाहेरच जास्त वेळ असतात.यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते.याबतच्या तक्रारी अनेकदा शासनाकडे गेल्या आहेत.त्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तलाठी ज्या गावात/सज्जा मध्ये कार्यरत आहे तिथेच राहणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्य महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी विष्णु पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
तलाठी ज्या गावात कार्यरत आहे त्या कार्यालयाच्या आवारात असलेले दोरे व बैठका यांचा तपशील लावावा.तसेच तलाठ्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदारी यांचा फलक कार्यालयात लावणे. तलाठी ,मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक फलकावर लिहिणे आवश्यक आहे. विविध शासकीय योजना व विविध उतारे व त्यासाठी लागणारा कालावधी यांची माहिती फलकावर लिहावी.
तलाठ्यांनी खाजगी व्यक्तीला कामास ठेवू नये असे झाल्यास संबंधित तलाठी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध दाखले यांची सूची व दरपत्रक कार्यालयात दर्शनी भागातील फलकावर लावणे बंधनकारक असल्याची माहिती पाटील यांनी दिली.