जुजारपुर (प्रतिनिधी)सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेले जुजारपुर हे गाव.. यंदा या गावाला परती चा पाऊस चांगला झाल्याने पूरस्थिती उद्भवलेली आहे.सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे
जुजारपुर व जूनोनी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.या गावांना जोडणारा जुजारपुर ओढ्याला खूप पाणी साचले आहे.या मुसळधार पाऊसा मुळे नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे.घरांची पडझड तसेच डाळिंब,ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे हा पूल ओलांडून येत असताना दोन दुचाकी वाहने पाण्यात वाहून गेली आहेत तर दोन नागरिकांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोणत्याही प्रकारची वित व जीवितहानी होवू नये याकरिता नदी व ओढ्या लागत राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षिततेचा ईशारा देण्यात आलेला आहे.
सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पाऊसाने ऊस,डाळिंब व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .शासनाने त्वरी त पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदत करावी.व सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जुजारपुर येथील युवानेते सुखदेव समृता पाटील यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा