उत्तरप्रदेश मधील हतरस येथील कुमारी मनीषा या दलीत तरुणीवर अमानवी ,पाशवी अत्याचार करून तिचा निर्दयपणे हत्या केली .यावरून देशात संतापाची लाट पसरली आहे .मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे.तरीही तेथील स्थानिक पोलीस हे पीडित कुटुंबास नाहक त्रास देत आहेत.माध्यमांच्या प्रत्तीनिधी ना तिथे व्र त संकलन करण्यापासून रोखल जात आहे .हेच का भारतीय जनता पार्टी चे अच्ये दिन.? असा प्रश्न जनता विचारत आहे.एवढ्येच नाही तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते मा.राहुल गांधी व मा.प्रियांका गांधी -वढेरा हे बहीण भाऊ पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यास जात होते.त्यांनाही पूलीसानी जावू दिले नाही.एवढी दडपशाही पोलीस कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत?
हात रस येथील घटनेवरून भाजप सोडून सर्व पक्ष जाती ,धर्मातील नागरिक संताप व्यक्त करून पीडित भगिनिस न्याय मिळावा दोशी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. बेटी बचाव बेटी पाढाव चा नारा देवून सतेत्त आलेल्या व अश्या अमानविय कृत्य करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणार्या भाजपा सरकारला इथली मायबाप जनता धडा शिकवला शिवाय राहणार नाही.
अभिनेत्री कंगना राणावत साठी आकांडतांडव करून तिला पाठींबा देणारे अता मूग गिळून गप्प का बसलेत.का कु.मनीषा वाल्मिकी भारताची कन्या नाही का?पीडित कुटुंबास घरी कोंडून ठेवून त्यांच्या परस्पर अंतिम संस्कार करण्याची एवढी घाई उतर प्रदेश पोलिसांनी कश्यासाठी केली गेली? उपस्थित पोलिस फक्त एवढेच सांगायचे की आम्हाला हे सर्व आदेश आहेत .पण कोणाचे आदेश आहेत हे नाव सांगत नव्हते.
हे सगळे पोलिस बळाचा वापर करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न उत र प्रदेश पोलिस करीत आहेत.पीडित कुटुंबाचा,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तेथील योगी सरकारकडून केला जात आहे.
सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी.अशी मागणी देशभरात जोर धरक आहे. निर्भया च्या वकील मा.adv सीमा कुशवाह यांनी मनिषाची केस लढणार आसून सोडणार नाही.
अशी तंबी दिली आहे. पीडित युवती ला न्याय मिळावा व नराधम ,आरोपीस फाशी शिक्षा मिळावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा