२१ सप्टेंबर २०२२

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्रोही विचारांचे 

साप्ताहिक शिवकाळ 

मुख्य संपादक - सुभाष गाडे(बी.ए.)

     रजि.नंबर -महा/मराठी२०११/३७९१६    मोबाईल नंबर (९८८१७५१६४३)
पुणे (शिवकाळ न्युज) आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक संचालनालय , मुंबई यांनी पुणे येथील  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.गणेश वंदना, तालवाद्य वादन, राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल गीते , पोवाडा सादर करण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आरयन देसाई यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.सदर सांस्कृतिक कार्यक्रम शाहीर श्रीकांत रेणके व सहकारी ढोलकी राहुल कुलकर्णी सिंथेसायसर दिपक पवार,भरत शर्मा,राहुल पवार यांनी साथसंगत केली.
       यावेळी प्रमुख अतिथी श्री संदीप ओव्हाळ, अँड राजेश महामुन कर , रोहीदास मदने,गंगाराम जाधव, सुभाष जाधव,शेखर गोरगले,सुरेश चव्हाण, शांताराम गोपने, प्रशांत गोपने, महेश महसुडगे,आरती ताई साठे,हिराजी बुवा,संदिप शेळके,भूषण कांबळे, राजाराम निकम इत्यादी उपस्थित होते.सांगता महाराष्ट्र गीताने झाली.मोठया संख्येने श्रोते उपस्थित होते.

१४ सप्टेंबर २०२२

नेतेमंडळी आणि शासकीय अधिकारी यांनी जुजारपूर गावात न येण्याचं गावकरी यांचं आवाहन

साप्ताहिक शिवकाळ

संस्थापक संपादक - सुभाष गाडे (बी.ए.)

रजि.नंबर महा/मराठी २०११/३७९१६ मो.न.९८८१७५१६४३

जुजारपूर हे सांगोला तालुक्याच्या पश्चिमेला असलेल गाव.या गावाला लागुन असलेल्या ओढ्याला सहा ते सात दिवस झाले पावसामुळे पाणी वाहत आहे.तयामुळे वाडी वस्तीवरील नागरीक,शालेय मुले,दुध उत्पादक यांचं खुप हाल होत आहेत.ही वार्ता सोशल मिडीया मुळे सगळीकडे पसरत आहे.दुसरा रस्ता नसल्यामुळे गावकरी खुप त्रस्त झाले आहेत. नागरीकांच्या वतीने जुजारपूर येथील शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी शासकीय अधिकारी व नेतेमंडळी यांनी गावात न येण्याचे आवाहन केले आहे.ओढयातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत तरी आमच्या गावाला भेट देऊ नये असं ग्रामस्थ बोलतात.कारण नेते मंडळी येतात आणि फक्त आश्वासना पलिकडे काही हाती लागत नाही.

          गावातुन वाडी वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते चांगले नाहीत.लोकप्रतिनिधी कडे विचारना केली तर करून टाकु,बघू अशी उत्तरे ठरलेलीच...ही गावकऱ्यांची फसवणूक आहे.आमचया गावातील ओढ्याला पाणी आल्याने ५0 % संपर्क बंद आहे.

    कुणाची गिनीज बुकात नोंद तर कुणी काय डोंगर काय झाडी या डायलाग ने महाराष्ट्र भर प्रसिद्धी होत आहेत.या ओढयातील पाण्यामुळे आमच्या गावातील मुलांना शाळेत येणापासुन वंचित रहावे लागत आहे.आमचे लोकांनी पिढ्या न पिढ्या तुम्हा नेते मंडळींच्या झेंडे उचलण्यात घालवल्या तेव्हा जागे व्हा आणि सत्तेला प्रश्न विचारणारे नागरीक बना असे सुशिक्षित नागरीकातून चर्चा चालू आहे.



०३ सप्टेंबर २०२२

समाजसेवेची तपस्या

 साप्ताहिक शिवकाळ

संपादक सुभाष गाडे 
(बी. ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)
मोबाईल नंबर -9881751643
Rag.No -mah/mar ३७९१६

मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन 

कुढल्याही गोष्टीची आवड माणसात जिद्द , चिकाटी आणि अथक परिश्रम निर्माण करण्याची क्षमता निर्माण करते.खानदेशातील एक तरुण नोकरीच्या उदेशाने पुण्यात दाखल होतो.आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर तो सहजपणे पूनेकरात मिसळतो.धुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्ता मा.जयेश अहिरे यांच्याविषयी....
               महाविद्यालयांमध्ये शिकत असताना आपल्या आई वडिलांकडून समाजकार्याचे बाळकडू मिळाले.कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही जिद्दीने सामाजिक कार्य करायला सुरुवात केली.कलेची आवड असल्यामुळे सर्व प्रथम रुद्र ढोल ताशा पथकाची स्थापना केली.बळीराजा पार्टी,पत्रकार संघटना,बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ यांच्या माध्यमातून लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेवून त्यावर आपले कार्य सुरू केले.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याविषयी आवाज उठवला.संपूर्ण महाराष्ट्रात तगडा जनसंपर्क असलेल्या मा.जयेश (भाऊ)अहिरे यांनी मग  मागे वळून पाहिले नाही....ते नेहमी बोलतात की समाजकारण हे मोबाईल व्हॉट्स अप वर डीपी/स्टेटस ठेवून करता येत नाही.त्यासाठी लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात.आपला बहुमूल्य वेळ व पैसा खर्च करावा लागतो.तेव्हा लोकसेवा होते.
          मा.जयेश अहिरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.एनसीसी मध्ये थल सेना कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्याने त्यांना बंदूक चालवण्याचे ज्ञान अवगत आहे. सन २००९ चे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मा.एस. सी.जमीर यांना सलामी शस्त्र अर्पण करण्याचा सन्मान त्यांना महाविद्यालय तर्फे मिळाला होता.समाजकार्य करण्याबरोबरच ते एक सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत.एस.पी.इन्फोटेक या कंपनीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असताना जयेश अहिरे यांना अनेकदा धमकवण्यात आले,खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला पण  ते डगमगले नाहीत सामान्य जनतेशी कायम नाळ जोडलेली आहे.
               दिनांक २६नोव्हेंबर २०२०रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली.आणि याच दिवशी सर्वानुमते जयेश (भाऊ) अहिरे यांची राष्ट्रीय मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तोच सामाजिक कार्याची धडाकेबाज सुरुवात झाली.संस्थेचे कार्य महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात,उत्तरप्रदेश, दिल्ली येथे सुरू आहे.फ्रान्स,आफ्रिका या देशात सुद्धा मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन च्य माध्यमातून लोकसेवा सुरू आहे.जागतिक स्तरावर संस्था समाजसेवेची तपस्या करून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणील यात तिळमात्र शंका नाही.
         संस्थकडून राबविले जात असलेले विविध उपक्रम
       १)महिलांसाठी मोफत शिवणकला ,/पार्लर        प्रशिक्षण,
२)अल्पदरात योगा, कराटे प्रशिक्षण
३)गाव तिथे वाचनालय
४)माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत नको असलेले द्या व हवे असलेले घेवून जा.
५)जनता दरबार 
          अश्याप्रकरे जनसेवा करण्याचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे.समाजातील बुद्धिजीवी वर्गाने सढळ हाताने मदत केल्यास आमच्या कार्याला अजून बळकटी येईल.आपण केलेली मदत आयकर कायद्याचा कलम ८०gनुसार करसवलती पात्र असेल.तर कृपया संस्थेस मदत करावी अशी विनंती.
        
                   



पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ  Rni rajistration no Mah/mar ३७९१६ मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे  संपर्क /9881751643,9822982750 (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता ...