१४ सप्टेंबर २०२२

नेतेमंडळी आणि शासकीय अधिकारी यांनी जुजारपूर गावात न येण्याचं गावकरी यांचं आवाहन

साप्ताहिक शिवकाळ

संस्थापक संपादक - सुभाष गाडे (बी.ए.)

रजि.नंबर महा/मराठी २०११/३७९१६ मो.न.९८८१७५१६४३

जुजारपूर हे सांगोला तालुक्याच्या पश्चिमेला असलेल गाव.या गावाला लागुन असलेल्या ओढ्याला सहा ते सात दिवस झाले पावसामुळे पाणी वाहत आहे.तयामुळे वाडी वस्तीवरील नागरीक,शालेय मुले,दुध उत्पादक यांचं खुप हाल होत आहेत.ही वार्ता सोशल मिडीया मुळे सगळीकडे पसरत आहे.दुसरा रस्ता नसल्यामुळे गावकरी खुप त्रस्त झाले आहेत. नागरीकांच्या वतीने जुजारपूर येथील शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी शासकीय अधिकारी व नेतेमंडळी यांनी गावात न येण्याचे आवाहन केले आहे.ओढयातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत तरी आमच्या गावाला भेट देऊ नये असं ग्रामस्थ बोलतात.कारण नेते मंडळी येतात आणि फक्त आश्वासना पलिकडे काही हाती लागत नाही.

          गावातुन वाडी वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते चांगले नाहीत.लोकप्रतिनिधी कडे विचारना केली तर करून टाकु,बघू अशी उत्तरे ठरलेलीच...ही गावकऱ्यांची फसवणूक आहे.आमचया गावातील ओढ्याला पाणी आल्याने ५0 % संपर्क बंद आहे.

    कुणाची गिनीज बुकात नोंद तर कुणी काय डोंगर काय झाडी या डायलाग ने महाराष्ट्र भर प्रसिद्धी होत आहेत.या ओढयातील पाण्यामुळे आमच्या गावातील मुलांना शाळेत येणापासुन वंचित रहावे लागत आहे.आमचे लोकांनी पिढ्या न पिढ्या तुम्हा नेते मंडळींच्या झेंडे उचलण्यात घालवल्या तेव्हा जागे व्हा आणि सत्तेला प्रश्न विचारणारे नागरीक बना असे सुशिक्षित नागरीकातून चर्चा चालू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सोडविणार -धनराज विसपुते

 साप्ताहिक शिवकाळ  Rni rajistration no Mah/mar ३७९१६ मुख्य संपादक - सुभाष अशोक गाडे  संपर्क /9881751643,9822982750 (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता ...