२१ सप्टेंबर २०२२

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्रोही विचारांचे 

साप्ताहिक शिवकाळ 

मुख्य संपादक - सुभाष गाडे(बी.ए.)

     रजि.नंबर -महा/मराठी२०११/३७९१६    मोबाईल नंबर (९८८१७५१६४३)
पुणे (शिवकाळ न्युज) आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक संचालनालय , मुंबई यांनी पुणे येथील  येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.गणेश वंदना, तालवाद्य वादन, राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल गीते , पोवाडा सादर करण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आरयन देसाई यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले.सदर सांस्कृतिक कार्यक्रम शाहीर श्रीकांत रेणके व सहकारी ढोलकी राहुल कुलकर्णी सिंथेसायसर दिपक पवार,भरत शर्मा,राहुल पवार यांनी साथसंगत केली.
       यावेळी प्रमुख अतिथी श्री संदीप ओव्हाळ, अँड राजेश महामुन कर , रोहीदास मदने,गंगाराम जाधव, सुभाष जाधव,शेखर गोरगले,सुरेश चव्हाण, शांताराम गोपने, प्रशांत गोपने, महेश महसुडगे,आरती ताई साठे,हिराजी बुवा,संदिप शेळके,भूषण कांबळे, राजाराम निकम इत्यादी उपस्थित होते.सांगता महाराष्ट्र गीताने झाली.मोठया संख्येने श्रोते उपस्थित होते.

१४ सप्टेंबर २०२२

नेतेमंडळी आणि शासकीय अधिकारी यांनी जुजारपूर गावात न येण्याचं गावकरी यांचं आवाहन

साप्ताहिक शिवकाळ

संस्थापक संपादक - सुभाष गाडे (बी.ए.)

रजि.नंबर महा/मराठी २०११/३७९१६ मो.न.९८८१७५१६४३

जुजारपूर हे सांगोला तालुक्याच्या पश्चिमेला असलेल गाव.या गावाला लागुन असलेल्या ओढ्याला सहा ते सात दिवस झाले पावसामुळे पाणी वाहत आहे.तयामुळे वाडी वस्तीवरील नागरीक,शालेय मुले,दुध उत्पादक यांचं खुप हाल होत आहेत.ही वार्ता सोशल मिडीया मुळे सगळीकडे पसरत आहे.दुसरा रस्ता नसल्यामुळे गावकरी खुप त्रस्त झाले आहेत. नागरीकांच्या वतीने जुजारपूर येथील शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी शासकीय अधिकारी व नेतेमंडळी यांनी गावात न येण्याचे आवाहन केले आहे.ओढयातील पाणी कमी होत नाही तोपर्यंत तरी आमच्या गावाला भेट देऊ नये असं ग्रामस्थ बोलतात.कारण नेते मंडळी येतात आणि फक्त आश्वासना पलिकडे काही हाती लागत नाही.

          गावातुन वाडी वस्त्यांमध्ये जाणारे रस्ते चांगले नाहीत.लोकप्रतिनिधी कडे विचारना केली तर करून टाकु,बघू अशी उत्तरे ठरलेलीच...ही गावकऱ्यांची फसवणूक आहे.आमचया गावातील ओढ्याला पाणी आल्याने ५0 % संपर्क बंद आहे.

    कुणाची गिनीज बुकात नोंद तर कुणी काय डोंगर काय झाडी या डायलाग ने महाराष्ट्र भर प्रसिद्धी होत आहेत.या ओढयातील पाण्यामुळे आमच्या गावातील मुलांना शाळेत येणापासुन वंचित रहावे लागत आहे.आमचे लोकांनी पिढ्या न पिढ्या तुम्हा नेते मंडळींच्या झेंडे उचलण्यात घालवल्या तेव्हा जागे व्हा आणि सत्तेला प्रश्न विचारणारे नागरीक बना असे सुशिक्षित नागरीकातून चर्चा चालू आहे.



०३ सप्टेंबर २०२२

समाजसेवेची तपस्या

 साप्ताहिक शिवकाळ

संपादक सुभाष गाडे 
(बी. ए.ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद)
मोबाईल नंबर -9881751643
Rag.No -mah/mar ३७९१६

मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन 

कुढल्याही गोष्टीची आवड माणसात जिद्द , चिकाटी आणि अथक परिश्रम निर्माण करण्याची क्षमता निर्माण करते.खानदेशातील एक तरुण नोकरीच्या उदेशाने पुण्यात दाखल होतो.आपल्या उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर तो सहजपणे पूनेकरात मिसळतो.धुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्ता मा.जयेश अहिरे यांच्याविषयी....
               महाविद्यालयांमध्ये शिकत असताना आपल्या आई वडिलांकडून समाजकार्याचे बाळकडू मिळाले.कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही जिद्दीने सामाजिक कार्य करायला सुरुवात केली.कलेची आवड असल्यामुळे सर्व प्रथम रुद्र ढोल ताशा पथकाची स्थापना केली.बळीराजा पार्टी,पत्रकार संघटना,बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ यांच्या माध्यमातून लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेवून त्यावर आपले कार्य सुरू केले.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याविषयी आवाज उठवला.संपूर्ण महाराष्ट्रात तगडा जनसंपर्क असलेल्या मा.जयेश (भाऊ)अहिरे यांनी मग  मागे वळून पाहिले नाही....ते नेहमी बोलतात की समाजकारण हे मोबाईल व्हॉट्स अप वर डीपी/स्टेटस ठेवून करता येत नाही.त्यासाठी लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतात.आपला बहुमूल्य वेळ व पैसा खर्च करावा लागतो.तेव्हा लोकसेवा होते.
          मा.जयेश अहिरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.एनसीसी मध्ये थल सेना कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेतल्याने त्यांना बंदूक चालवण्याचे ज्ञान अवगत आहे. सन २००९ चे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मा.एस. सी.जमीर यांना सलामी शस्त्र अर्पण करण्याचा सन्मान त्यांना महाविद्यालय तर्फे मिळाला होता.समाजकार्य करण्याबरोबरच ते एक सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहेत.एस.पी.इन्फोटेक या कंपनीने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत असताना जयेश अहिरे यांना अनेकदा धमकवण्यात आले,खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला पण  ते डगमगले नाहीत सामान्य जनतेशी कायम नाळ जोडलेली आहे.
               दिनांक २६नोव्हेंबर २०२०रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली.आणि याच दिवशी सर्वानुमते जयेश (भाऊ) अहिरे यांची राष्ट्रीय मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तोच सामाजिक कार्याची धडाकेबाज सुरुवात झाली.संस्थेचे कार्य महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात,उत्तरप्रदेश, दिल्ली येथे सुरू आहे.फ्रान्स,आफ्रिका या देशात सुद्धा मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन च्य माध्यमातून लोकसेवा सुरू आहे.जागतिक स्तरावर संस्था समाजसेवेची तपस्या करून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणील यात तिळमात्र शंका नाही.
         संस्थकडून राबविले जात असलेले विविध उपक्रम
       १)महिलांसाठी मोफत शिवणकला ,/पार्लर        प्रशिक्षण,
२)अल्पदरात योगा, कराटे प्रशिक्षण
३)गाव तिथे वाचनालय
४)माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत नको असलेले द्या व हवे असलेले घेवून जा.
५)जनता दरबार 
          अश्याप्रकरे जनसेवा करण्याचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे.समाजातील बुद्धिजीवी वर्गाने सढळ हाताने मदत केल्यास आमच्या कार्याला अजून बळकटी येईल.आपण केलेली मदत आयकर कायद्याचा कलम ८०gनुसार करसवलती पात्र असेल.तर कृपया संस्थेस मदत करावी अशी विनंती.
        
                   



२३ ऑगस्ट २०२२

दीपक काळे (सर)शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित

 साप्ताहिक शिवकाळ रजी.नं.mah/mar/2011/37916.

मुख्य संपादक -सुभाष गाडे (बी.ए.ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद).मोबाईल न.९८८१७५१६४३

दीपक काळे शैक्षणिक  पुरस्कारांनी सन्मानित

बेळगांव (शिवकाळ न्युज)बेळगांव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे दिनांक १६ ऑगस्ट २०२२रोजी राष्ट्रीय संस्कृती संमेलन संपन्न झाले.या संमेलनाचे आयोजन शाम  रंजन फाऊंडेशन ,मुंबई विद्यार्थी विकास अकादमी,महाराष्ट्र यांनी केले होते.यात  गुनिजनांची समरसता व गुणवत्ता पूर्ण कार्यक्षम कार्यातून आपला देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल यावर दृढनिश्चय करून कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा कौतुक व सन्मान सोहळा आयोजित केला होता.यावेळी मेळघाट (अमरावती)येथील थोर समाजसेवक व पद्मश्री पुरस्काने सन्मानित मा.डॉक्टर श्री रवींद्र कोल्हे व माननीय डॉक्टर  सौ.स्मिता कोल्हे यांच्या हस्ते कला,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात उलेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

         यावेळी स्वरा स्पोकन इंग्लिश व परसनालिटी डेव्हलपमेंट संस्थेचे प्रमुख माननीय दीपक काळे (सर)यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार मा.थोर समाजसेवक पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व माननीय.डॉक्टर सौ.स्मिता कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आला.दीपक काळे सर हे दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी हजारो लोकांच्या मनातील इंग्लिश भाषेची भीती दूर करून त्यांना इंग्लिश बोलायला शिकविले आहे.दर रविवारी ते संस्थेच्यावतीने व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे करतात.

           या राष्ट्रीय संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष लेखक/चित्रपट निर्माता संदीप राक्षे हे होते. संमेलनाचे उद्घाटक अशोक दाभोलकर (माजी मुख्य पंच भारत पाकिस्तान शूटिंग बॉल, वनडे)यांनी केले.प्रमुख पाहुणे संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे,अभिनेत्री रिया पाटील,व पुरस्कार निवड समिती अध्यक्ष थाबाजी शिंदे हे होते या राष्ट्रीय संस्कृती संमेलनाचे आयोजन माननीय कृष्णा बामणे,विद्यार्थी विकास अकादमी चे प्रमुख प्रा.डॉक्टर बी. एन.खरात,शाम रंजन फाऊंडेशन च्या अध्यक्षा माननीय स्वाती पवार यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण हजारो प्रयोग करून लाखो लोकांचे मनोरंजन करणारे गोवा येथील अंतर राष्ट्रीय जादूगार प्रेमानंद उर्फ प्रेम आनंद पाटील हे उपस्थित होते.

१६ ऑगस्ट २०२२

उपसरपंचपदी पवण गाडे

विद्रोही विचारांचे 

साप्ताहिक शिवकाळ

मुख्य संपादक सुभाष गाडे 
मोबाईल नंबर 9881751643
RNI .No.-mah/mar/2011/37916


सांगोला (शिवकाळ न्युज)सांगोला तालुक्यातील जूजार पूर हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असते. या तालुक्यातील राजकारणात शेतकरी कामगार पक्ष या प्रादेशिक पक्ष्याला जनाधार खूप मिळालेला आहे.कारण या पक्षात निष्ठावंताची कदर केली जाते.व योग्य असा न्याय दिला जातो.त्यामुळे सांगोल्यात शेकाप हा पक्ष कष्टकरी,कामगार,उपेक्षित,शेतकरी यांनी टिकवून ठेवला आहे.स्वर्गीय आमदार गणपतराव जी देशमुख यांनी एकच पक्ष एकच मतदार संघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विश्र्विक्रम नोंदवलेला आहे.
     अनुसूचित जातीसाठी आरक्षण नसतांना सुधा पवन गाडे यासारख्या तरुण कार्यकर्त्याला शेतकरी कामगार पक्षाने उपसरपंच पदावर काम करण्याची संधी देवून आपला पुरोगामी बाणा दाखवून दिला आहे.निवड प्रसंगी बोलताना मिळालेल्या उपसरपंच पदाचा उपयोग गावच्या,समाजाच्या हितासाठी करणार आहे असे त्यांनी साप्ताहिक शिवकाळ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
      जुजारपुर चे विद्यमान सरपंच इंदुबाई माने य आहेत.तर मावळते उपसरपंच श्रावण वाघमोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर सर्वानुमते पवन गाडे यांची निवड करण्यात आली आहे.मुळात पवन गाडे हे राजकारणात कमी व समाजकार्यात जास्त अग्रेसर असतात. अस्तित्व समजविकास व संशोधन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात समाजक्रांती ची मोठी चळवळ उभी केली असून तालुक्यात त्यांचा मित्रपरिवार पण मोठा आहे.स्त्री पुरुष समानता,शेतकऱ्यांचे विविध प्रश्न,अन्याविरुध्य पेटून उठण भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढा हे त्यांच्या कामाचे आवडते विषय आहेत.
             पवन गाडे यांची निवड उपसरपंच या पदावर होण्यासाठी मा.गजेंद्र हिप्परकर,बाळासाहेब पाटील,पिंटू माने,राजेंद्र पाटील,मारुती हिप्परकर,पांडुरंग वाघमोडे, दादासो खडके,सुखदेव पाटील,श्रीमंत पाटील,तुकाराम पाटील,गुलाब चौगुले,बिरुदेव चौगुले, कल्लापा गाडे,सागर पाटील,संजय ओव्हाळ,सतीश गाडे यांनी मोलाचे योगदान दिले. सदर निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुजार पुर येथे विशेष सत्कार करून पुढील कारकिर्दी शुभेक्ष्या दिल्या.

प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत क्षीरसागर

 साप्ताहिक शिवकाळ.                    संस्थापक संपादक सुभाष गाडे  नोंदणी क्रमांक महा/मराठी३७९१६ पुणे(शिवकाळ न्युज) निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृ...